Tuesday 17 December 2019

NRC आणि CAB किंवा आता CAA मधील फरक लक्षात घ्या आणि ते का आणावे लागले ते ही समजून घ्या ... "सिटीजन अमेंडमेंट बील" हे म्हणजे मुख्यतः पाकिस्तान आणि बांग्लादेश येथील शोषित अल्पसंख्याक (हिंदू,जैन,बौद्ध,पारशी,ख्रिश्चन) ज्यातले काही ऑलरेडी भारतात आश्रीत म्हणूण आलेले आहेत त्यांना मानवता म्हणूण आत घेणे (नागरीकत्व देणे) बास.... मग आता यात इथल्या मुसलमानांना त्रास होण्याचं काही कारण आहे का ?? संबंध च काय ??

आता NRC कडे वळूयात ..." नैशनल रजिस्टर सिटीजन" हे बिल अजून यायचंय तर यायच्या आधीच उलट सूलट चर्चा करुन माथी भडकावून, गैरसमज पसरवून भितीचं वातावरण तयार केलं जातंय ....तर हे बिल म्हणजे जे रोहींग्यां ,बांग्लादेशी, पाकिस्तानी नागरिक घुसखोरी करुन अवैध भारतात राहतायेत त्यांना शोधून काढणे आणि त्याना परत पाठवणे (कारण त्यांना ऑलरेडी आपण त्यांचे देश दिलेले आहेत हा त्यामागचा विचार) ....आता परत यात इथले नागरिक असणारे वर्षानुवर्षे इकडे राहणारे मुसलमानांना त्रास होण्याचं काही कारण आहे का ?? इथेही काही संबंध नाही.

मग का पेटलंय इतकं सगळं ...का इतका विरोध केला जातोय, तर मित्रांनो या मागचं षडयंत्र समजून घ्या ...या देशात कायमच मुस्लिमांना एका ठराविक वर्गाची (पक्षाची) भिती दाखवून त्यांची मतं घेतली गेलीयेत ...आम्ही सत्तेत आहोत म्हणूण तुम्ही सुरक्षित आहात हीच सत्ता जर उद्या भाजपच्या हाती गेली तर तुमचं काही खरं नाही ...ते तुम्हाला या देशाबाहेर हाकलणार अशी सतत एक हैमरिंग वारंवार केलं गेलंय, मानसिकता बनवली गेलीये आणि म्हणूनच आज कुठे जरा जरी खुट्ट झालं की लगेच बोंबाबोंब होते ...जे काय होतंय ते सगळं आमच्याच विरोधात चालू आहे अशी एक भावना मुस्लिम समाजाच्या मनात निर्माण होते ...

अर्थात मुस्लिम समाज ही काही इतका दुधखुळा नक्कीच नाही की कुणी घाबरवावे आणि यांनी घाबरावे ...ह्या भिती मागे त्यांची स्वतःची देखील एक मानसिकता आहे (१००% म्हणत नाही मी पण आहेत बहुतांश) त्यांनी कधी हा देश आपला मनापासून मानलाच नाही. सतत पाकिस्तान चा पुळका ..मग इकडे राहुनही इथल्या मातीशी एकरुप न होता मिळून मिसळून न राहता हा 'काफिर' तो 'मुश्रीक' असं ह्यांचं वागणं ...म्हणून मग अश्यांना भिती वाटणं ही सहाजिकच आहे.

पण मित्रांनो माझ्या सारख्या हिंदुस्थानी मुसलमानाच्या मनात किंचित ही भिती नाही ...आणि भिती असावी तरी का ?? कारण मला माहीतये माझ्यावर येणारं संकंट आधी स्वतः वर झेलणारी वेळप्रसंगी जीवाला जीव देणारी माझी मराठा, ब्राह्मण, शिख, जैन,मारवाडी, दलित मित्र माझ्या साठी उभे ठाकतील...माझ्या हक्का साठी आवाज उठवतिल ...मला उचलून कुणीही देशाबाहेर काढेल तेव्हा माझे हे मित्र गप्प बसतील का ?? कधीच नाही ...मग मी का घाबरु ?? का कुणाच्या ही सांगण्यावरुन ,भडकावण्यावरुन माझ्या च देशाच्या संसाधनांचं नुकसान करु ??

इतका मुर्ख मी नक्कीच नाही ....

एक उदाहरण देतो ...शाळेत दहावी ला असतांना मी शाळेतल्या क्रिकेट संघात होतो पण काही कारणास्तव मला संघातून ऐनवेळी काढून टाकण्यात आले ...त्या घटनेवरुन माझ्या वर्गातील इतर मित्र भडकली त्यांनी एकाच दिवसात एक दुसरा संघ तयार केला, मला कैप्टन बनवलं आणि घोषित केलं की आधीचा संघ आणि आता बनवलेला संघ यात एक सामना होईल आणि जो जिंकेल तो टुर्नामेंट खेळेल....सगळ्यांचीच तंतरली ऐनवेळी जर का हरलो तर अख्खा संघच बाद व्हायचा त्या पेक्षा इमरानलाच परत संघात घ्या असं ठरलं ....आता बाकीच्यांनी माझ्या साठी संघ तयार केला आणि आता मी यांना सोडून कसा जाऊ असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला ...तेव्हा ते ओळखून माझे ते मित्र मला म्हणाले इमरान वेडा आहेस का तु फक्त तुझ्यासाठी (तुझ्या वर अन्याय झाला म्हणून) आम्ही हे सगळं केलं आम्हाला खेळायचं नव्हतंच ...तु जा आणि खेळ, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी ....मग काय दहा हत्तींचं बळंच जणू माझ्या अंगात आलं ...ती टुर्नामेंट तर आम्ही जिंकलोच पण फायनल मैच मधे मी "मैन ऑफ द मैच"  होतो.

जे मित्र मला साध्या शाळेतल्या संघाबाहेर जाऊ देत नाहीत(कुणी मला संघातनं काढलेलं त्यांना सहन होत नाही)   ते मला जर उद्या कुणी ह्या देशाबाहेर काढू पाहत असतिल तर गप्प बसतिल का ??? 😊

इतका विषय साधा आहे मित्रांनो ....उगाच पराचा कावळा केला जातोय आणि तुम्ही बळी पडताय ...या मातीत डोकं टेकवता तुम्ही पाच वेळेस हीच माती डोक्याला लावा आणि निर्धास्त रहा ...कारण भित्यापोटी ब्रम्हराक्षस असतो हे ध्यानात ठेवा ....तुमच्या याच भितीचा फायदा उचलण्यासाठी टपून बसलेत काही जणं ...जाळपोळ, तोडफोड करायला तुम्हाला पुढे करणार आणि आपण मागून तमाशा बघणार ... कारण तुमच्या टोप्या आणि तुमच्या वेषभूषेवरनं तुम्ही पटकन ओळखू येताय .... सगळा देश बघतोय तुम्ही काय करताय ते.

एकीकडे लाखोंच्या संख्येने आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज बघा आणि तुम्ही करत असलेले हे भयानक चित्र बघा, काय मेसेज जातोय समाजात ??

छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार नसांनसांत भिणलेला मराठा समाज पानाच्या देठालाही धक्का लावत नाही आणि तुम्ही बसं जाळता?? रेल्वे जाळता ??? पोलिसांवर दगडफेक करता ?? 😢😢

खुपच दुखःद आहे हे ....वेळीच सावरा, कुणाच्या हातचं खेळणं बनू नका,बाकी कुणी करो न करो तुमच्या मनातली ही अनाहुत भितीच तुमचं फार मोठं नुकसान करणार आहे भविष्यात ....म्हणूण अजून वेळ गेलेली नाही परत फिरा

आणि अभिमानाने म्हणा होय आम्ही "हिंदुस्थानी मुस्लिम आहोत" हे आमचं घर आहे आणि निर्धास्त रहा तुमच्या घरातनं तुम्हाला कोणीही काढणार नाहीये.

मी "शेख इमरान" एक  हिंदुस्थानी मुस्लिम निर्धास्त, बिंधास्त माझं आयुष्य या देशात जगतोय आणि जगेन ...आणि ज्या देशात महाराष्ट्रातील एका छोट्याश्या खेड्यात माझे पणजोबा "अहमद शेख" (भाई मास्तर) आणि "नानासाहेब पाटील" यांच्या मैत्रीच्या आज ही शपथा खाल्ल्या जातात (ते जाऊन बराच काळ लोटल्यानंतर ही ) त्या देशात माझ्या व माझ्या परिवाच्या केसालाही धक्का लागणार नाही याची मला पुर्ण खात्री आहे किंबहुना तशी तिळमात्र ही शंका माझ्या मनात नाही 😊👍👍

#जय_हिंद_जय_भारत




No comments:

Post a Comment